खंडाळा येथील पाण्याच्या टाकी खालील हे ऐतिहासिक दगडी बांधकाम आहे. याच्या समोर एका नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. नंदीची मूर्ती म्हणजे शेजारी शंकराची पिंड हि असतेच पण शोधून हि ती सापडली नाही. जास्त वाढलेल्या झाडीमुळे शोधकार्य अवघड आहे.

फोटो संग्रह

aitihasik vihir

खंडाळा गावातील महादेव मंदिरामागे असलेली ही विहीर शिवकालीन आहे असे म्हटले जाते. या विहिरीचे बांधकाम पाहता ही एक पुरातन कालीन विहीर आहे असे समजते. या विहिरी मधे उतरण्यासाठी उत्तरे ला पायर्‍यांची व्यवस्था आहे तर पूर्वेस विहिरीतून पाणी उपसण्यासाठी मोटेची व्यवस्था केलेली आढळून येते.

विहिरी मधे उतरले असता प्रवेशद्वारवरच एक शिलालेख लिहिलेला पाहण्यास मिळतो. हा शिलालेख मोडी लिपी मधे लिहिला गेलेला आहे. याचे भाषांतर पुढीलप्रमाणे

‘श्री सांब चरनी तत्पर नारो अनंत परचुरे’, ‘महाजन कसबे गोहागर निरंतर श्री शके १६५ जय नाम संवत्सरे’

तसेच विहिरीचा आतील भिंतींवर काही देवळी  असून त्यातील एका देवळी मधे गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे. ही मूर्ती सुद्धा प्राचीन कालीन दगडापासून निर्मित आहे. विहिरीचा बराचसा भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. पूर्वीचा काळी ही विहीर गावामधील पाणीपुरवठ्याचा स्त्रोत असावी. या विहिरीवर एकून बारा मोटेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

फोटो संग्रह

पूर्वीच्या शिव मंदिराची खासियत अशी असती कि ते गावाच्या बाहेर सीमे जवळ किंवा नदी शेजारी असते. असेच पुरातन शिव मंदिर खंडाळा येथे आहे. आत्ता या मंदिराचा पूर्णपणे जीर्णोद्धार केला गेला आहे. पुरातन मंदिराची पारंपरिक शैली पूर्णपणे बदलून त्याजागी सिमेंटचा वापर करून नवीन मंदिराची निर्मिती केली आहे. पूर्वीचे मंदिर हेमाडपंती होते. मंदिरामध्ये असलेली शंकांची पिंड आणि नंदी गावकऱ्यांनी जतन करण्यासाठी सातारा येथील पुरातात्विक कॉलेजला देण्यात आले आहे.

याच शिवमंदिराशेजारी सुमारे ६०० वर्षांपूर्वीच्या विरगळी सापडल्या. या विरगळी जमिनीखाली गाडल्या गेलेल्या होत्या. इतिहासप्रेमी आणि तरुणांनी पुढाकार घेऊन त्या विरगळींचे उत्खनन करून त्या सुरक्षित भैरवनाथ मंदिराशेजारी ठेवल्या. या विरगळी पूर्णपणे अखंड दगडामध्ये कोरलेल्या आहेत. या विरगळी मध्ये चार वेगवेगळ्या प्रसंगाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. विरगळींचा अर्थ समजण्यासाठी त्याचे वाचन उलट्या क्रमाने करावे लागते.

  • तर सर्वात खालच्या रकान्यात एक व्यक्ती झोपलेल्या अवस्थेत दाखवलेला आहे याचा अर्थ असा कि हा या गावाचा मुख्य व्यक्ती असून तो मृत झालेला असावा.
  • त्याच्या वरच्या रकान्यात लढाईचे चित्रण केले आहे. याचा अर्थ हा व्यक्ती या लढाईतील मुख्य लढवय्या असावा आणि त्याला लढाईत वीरमरण आले असावे.
  • तिसऱ्या रकान्यामध्ये एक पुरुष व तीन स्त्रीया अशा प्रतिमा कोरल्या आहेत यातील एक स्त्रीने त्या व्यक्तीचा हात हातात घेतला आहे आणि दुसरा हात वरती आभाळाकडे केलेला आहे. याचा अर्थ असा कि लढाईत वीरगती प्राप्त झालेल्या वीरास तीन अप्सरा स्वर्गात घेऊन चालल्या आहेत
  • सगळ्यात वरच्या रकान्यामध्ये शिवाची आराधना करणारा वीर व त्याच्याबरोबर पुजारी याचे चित्रण केले आहे. याचा अर्थ माणूस मृत्यू झाल्यानंतर तो कैलासवासी जातो असा होऊ शकतो.

बाकीच्या विरगळी वरील चित्र अस्पष्ट् दिसत आहेत त्यामुळे त्याचा अर्थ लावणे अवघड आहे.

 

विशेष आभार – इतिहासप्रेमी संतोष देशमुख

तळघर म्हणजे पूर्वीच्या काळी मौल्यवान वस्तू लपवून ठेवण्यासाठी अथवा साठवणुकीसाठी जमिनीच्या अंशतः किंवा पूर्णपणे खाली छोटया खोल्यांची बांधणी केली जायची. युद्धामध्ये शत्रूपासून लपण्यासाठी हि याचा वापर केला जात असे.

खंडाळा येथे सापडलेल्या तळघराची लांबी १० फूट असून रुंदी १० फूट तर उंची १२ फूट आहे. रोहिदास गाढवे यांच्या घराचा पाया खोदत असताना ऐतिहासिक तळघर आढळून आले. तर येथून जवळ असलेल्या पुरातन शिवमंदिरा शेजारी ६०० वर्षांपूर्वीच्या विरगळी सापडलेल्या आहेत. या विरगळीचे सापडणे आणि तळघराची बांधकाम शैली यावरून असे स्पष्ट होते कि हे तळघर शिवकाळातील असावे. तळघरात उतरण्यासाठी अतिशय अरुंद व दगडी वाट आहे. एकावेळी एकच माणूस आत उतरू शकतो. या तळघराच्या प्रवेशद्वारावर दगडी तोडीचे झाकण होते अशी माहिती इतिहासप्रेमी श्री संतोष देशमुख यांनी दिली. या तळघराच्या भिंतीमध्ये देवळीची रचना केलेली आहे. तळघर जमिनीखाली असल्याने प्रकाशासाठी या देवळीमध्ये दिवे लावले जात असावे.

विशेष आभार- श्री संतोष

अधिक माहितीसाठी Youtube विडिओ बघू शकता

Navankur TV

प्राचीन काळी सर्वसामान्य लोकांना भाषेचे ज्ञान अवगत न्हवते त्यामुळे राजाज्ञा किंवा महत्वाचे संदेश चित्र लिपीतून पाषाणांवर ( दगडावर ) कोरली जायची याला शिलालेख बोलतात. शिलालेख दिर्घकाळ टिकतात आणि त्यामध्ये बदल होऊ शकत नाही. शिलालेख लिहिण्याची सुरुवात प्राचीन भरतापासून सुरु झाल्याचे पुरावे सापडतात. तर खंडाळा येथे सापडलेली धनुगळ हि शिवकालीन असून ती ६०० ते ७०० वर्षे जुनी आहे.

साधारण धनुगळेवर गाय वासरू हे सांकेतिक चिन्ह आढळते. माझ्या मते याचा अर्थ असा की गाय म्हणजे आत्ताची पिढी आणि वासरू म्हणजे ( वंशज ) नंतरची पिढी हे सदर जमिनीचा उपभोग घेऊ शकतात असा अपेक्षित आहे. धनुगळच्या वरील बाजूस असलेले चंद्र सूर्य म्हणजे सदरची जमीन चंद्र सूर्य असेपर्यंत त्या कुटुंबाची असेल आणि धनुगळच्या खालच्या भागामध्ये राजाच्या आज्ञेचे प्रतीक म्हणून तलवारीचेही चित्रांकन केलेले याचा अर्थ सदरची जमीन राजाने त्या कुटुंबासाठी दान किंवा बक्षीस म्हणून दिली गेलेली असावी आणि लोकांनी त्यावर हक्क सांगू नये व राजाज्ञा पाळावी असा होतो.

खंडाळा येथे सापडलेली धनुगळ ही याहीपेक्षा वेगळी आहे कारण या धनुगळीवर फक्त गायीचे चित्रांकन केले आहे. तिच्या बरोबरचे वासरु नाही. तसेच तिच्या पुढे “गव्हाण” म्हणजे चारा ठेवायचे भांडे देखील कोरले आहे. माझ्या मते याचा अर्थ असा की सदरची जमीन फक्त गायी चारण्यासाठी किंवा गोशाळेसाठी राखीव ठेवण्यात आली असावी.

स्थानिकांच्या मते या जागेस गधे-गाढवाचा माळ असे नाव असल्याने या दगडावर गाढव कोरले आहे व ती गधेगळ असावी असा स्थानिकांचा समज होता परंतु जिज्ञासाच्या सदस्यांनी सदरचा दगड स्वच्छ करून त्याचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर ती गधेगळ नसून धनुगळ आहे असा निष्कर्ष निघाला हि माहिती इतिहासप्रेमी संतोष देशमुख यांनी दिली आहे.

वरील माहिती पूर्णतः बरोबर असेल असे नाही. धनुगळ हि सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी तयार केली गेली आहे याचे लिखित पुरावे उपलब्ध नाही.

विशेष आभार- श्री संतोष देशमुख

subhan mangal

इतिहास 

आदिलशहाचा वजीर मुस्तफ़ाखानाने २५ जुलै १६४८ रोजी शहाजी राजांना बेसावध गाठुन कैद केले. त्याबरोबर आदिलशहाने शिवाजी महाराजांचे परिपत्य करण्यासाठी फ़तेहखानाला पाठवल. त्यावेळी स्वराज्याचा आकार लहान होता. स्वराज्यात शिरुन त्याची नासधुस करु नये म्हणुन शत्रूला आपल्या स्वराज्यात शिरु द्यायच नाही असा विचार करून महाराजांनी स्वराज्याच्या सीमेवर शत्रुशी दोन हात करायचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे पुरंदर किल्ला आणि त्याच्या आसपासचा परीसर हे युध्द क्षेत्र ठरवण्यात आल.

महाराज पुरंदरवर असल्याने फ़तेहखानाने पुरंदरच्या जवळ बेलसरला छावणी टाकली आणि बाळाजी हैबतरावांना शिरवळच्या किल्ला घेण्यासाठी पाठवले. महाराजांचे सैन्य कमी होते. त्यांना सैन्याची हानीही करायची नव्हती. त्यामुळे त्यांनी विशेष प्रतिकार न करता किल्ला फ़तेखानाच्या स्वाधिन केला. सुभान मंगळ सहजासहजी हाती आल्याने बाळाजी हैबतराव बेफ़िकीर राहीला. दुसर्‍या दिवशी पहाटेच कावजी मल्हार खासनीस या सरदाराला महाराजांनी सुभानमंगळ घेण्यास पाठवले. त्याने किल्ल्याचा तट फ़ोडुन किल्ल्यात प्रवेश केला आणि गाफ़िल शत्रूवर हल्ला करुन किल्ला जिंकुन घेतला.

पहाण्याची ठिकाणे 

नीरा नदीकाठी सुभानमंगळ किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला आहे. सुभानमंगळ किल्ला भुईकोट प्रकारात येत असून कालौघाने किल्ल्याची पडझड झाली असून फारसे अवशेष बघायला मिळत नाहीत. किल्ल्याची निशाणी असलेला एकमेव बुरुज आज षिल्लक आहे. बुरुजाजवळ असलेल्या दुर्गा देवीचे मुख पूर्वेला आहे. बुरुजावर भगवा झेंडा आहे. आपण किल्ल्यावर दुर्गा देवीच्या मंदिरात प्रवेश करण्या अगोदर डाव्या हाताला दोन वीरगळी पाहायला मिळतात. किल्ल्याची तटबंदी ढासळलेली आहे. किल्ल्याच्या माथ्यावर पायवाट असून फेरी मारल्यास नीरा नदीचे विहंगम दृश्य पाहता येते. किल्ल्यावर असलेल्या दाट झुडूपानमूळे किल्ल्याचा परिसर झाकला गेला आहे.

ऐतिहासिक शिरवळ हे धार्मिक स्थान असावे केदारेश्वर मंदिर, अंबिका मंदिर, भैरवनाथ मंदिर, मंडाईदेवी मंदिर आणि रामेश्वर मंदिर अशी वैविध्याने नटलेली मंदिरे पाहायला मिळतात.

पोहोचण्याच्या वाटा 

पुण्याहून स्वारगेट एस. टी. स्थानकातून कराड- साताराला जाणार्‍या एस. टी. ने शिरवळला पोहचता येते. बसने शिरवळ बस स्थानकात उतरून पुण्याच्या दिशेने १ किलोमीटर चालत गेल्यास डाव्या बाजूला केदारेश्वर मंदिर आणि उजव्या बाजूला शिरवळचा राजा मंदिर पाहून ब्राह्मण गल्लीतून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. वाट गावाच्या मध्य भागातून आणि बाजारपेठेतून जाते. किल्ल्याच्या समोरच प्रगती मुलींची शाळा आहे.

Source:-www.forttrekkers.com/subhan-mangal-fort-pune.html
Image Source:- Vicharmanthan Shirwal-Pride fb page

Credit:-  Forttrekkers writer

शिरवळ जवळील पांडवदरा ही १५ बौद्ध लेणींपैकी एक आहे असे समजले जाते. शिरवळ येथून जवळच दक्षिणेस सुमारे दोन तीन किलो मीटर अंतरावर पांडव दरा लेणी आहे. या लेणी काळा पाषाण खोदून अनेक छोट्या गुहा तयार केल्या आहेत. या सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगेत वसलेल्या आहेत.

पूर्वीच्या काळी पांडव अज्ञातवासात असताना त्यांनी या लेण्यांची निर्मिती करून त्यांनी या ठिकाणी मुक्काम केला होता अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यावरून या लेण्यांना पांडव लेणी असे म्हटले जाते.

फोटो संग्रह​

jakat pavai

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळ हद्दीतील नायगाव फाट्याजवळ पाषाणात कोरलेली पाणपोई आहे. ही पाणपोई सुमारे हजार ते बाराशे वर्षांपूर्वी ‘जकात पिव्हई’ म्हणजे जकात नाक्यावर केलेली असावी. पूर्वीच्या काळी वाटसरूंची तहान भागविण्यासाठी ही पाणपोई उभारण्यात आलेली असावी. अखंड पाषाणात कोरलेले दोन खांब, त्यामागे घडवलेले मोठे पाषाण एकमेकांवर रचून खोली तयार केली आहे. छतही एकमेकांवर दगडी रचून तयार करण्यात आले आहे. आतमध्ये जमिनीशी समतल दोन रांजण असून ते दगडी आहेत. हे सारे बांधकाम ‘शुषकसांधा’ पद्धतीचे म्हणजे कोणतेही चुना वा सिमेंट सारखे पदार्थ न वापरता करण्यात आले आहे.

धर्मशाळा बांधणे, पाणपोया उभारणे या संकल्पना कालबाह्य होत चालल्या आहे; पण मानवतावादी, सांस्कृतिक वारशाची साक्ष देणाऱ्या वास्तू आपन आजहि बघतो.

विशेष आभार- संदीप शेंडे