subhan mangal

इतिहास 

आदिलशहाचा वजीर मुस्तफ़ाखानाने २५ जुलै १६४८ रोजी शहाजी राजांना बेसावध गाठुन कैद केले. त्याबरोबर आदिलशहाने शिवाजी महाराजांचे परिपत्य करण्यासाठी फ़तेहखानाला पाठवल. त्यावेळी स्वराज्याचा आकार लहान होता. स्वराज्यात शिरुन त्याची नासधुस करु नये म्हणुन शत्रूला आपल्या स्वराज्यात शिरु द्यायच नाही असा विचार करून महाराजांनी स्वराज्याच्या सीमेवर शत्रुशी दोन हात करायचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे पुरंदर किल्ला आणि त्याच्या आसपासचा परीसर हे युध्द क्षेत्र ठरवण्यात आल.

महाराज पुरंदरवर असल्याने फ़तेहखानाने पुरंदरच्या जवळ बेलसरला छावणी टाकली आणि बाळाजी हैबतरावांना शिरवळच्या किल्ला घेण्यासाठी पाठवले. महाराजांचे सैन्य कमी होते. त्यांना सैन्याची हानीही करायची नव्हती. त्यामुळे त्यांनी विशेष प्रतिकार न करता किल्ला फ़तेखानाच्या स्वाधिन केला. सुभान मंगळ सहजासहजी हाती आल्याने बाळाजी हैबतराव बेफ़िकीर राहीला. दुसर्‍या दिवशी पहाटेच कावजी मल्हार खासनीस या सरदाराला महाराजांनी सुभानमंगळ घेण्यास पाठवले. त्याने किल्ल्याचा तट फ़ोडुन किल्ल्यात प्रवेश केला आणि गाफ़िल शत्रूवर हल्ला करुन किल्ला जिंकुन घेतला.

पहाण्याची ठिकाणे 

नीरा नदीकाठी सुभानमंगळ किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला आहे. सुभानमंगळ किल्ला भुईकोट प्रकारात येत असून कालौघाने किल्ल्याची पडझड झाली असून फारसे अवशेष बघायला मिळत नाहीत. किल्ल्याची निशाणी असलेला एकमेव बुरुज आज षिल्लक आहे. बुरुजाजवळ असलेल्या दुर्गा देवीचे मुख पूर्वेला आहे. बुरुजावर भगवा झेंडा आहे. आपण किल्ल्यावर दुर्गा देवीच्या मंदिरात प्रवेश करण्या अगोदर डाव्या हाताला दोन वीरगळी पाहायला मिळतात. किल्ल्याची तटबंदी ढासळलेली आहे. किल्ल्याच्या माथ्यावर पायवाट असून फेरी मारल्यास नीरा नदीचे विहंगम दृश्य पाहता येते. किल्ल्यावर असलेल्या दाट झुडूपानमूळे किल्ल्याचा परिसर झाकला गेला आहे.

ऐतिहासिक शिरवळ हे धार्मिक स्थान असावे केदारेश्वर मंदिर, अंबिका मंदिर, भैरवनाथ मंदिर, मंडाईदेवी मंदिर आणि रामेश्वर मंदिर अशी वैविध्याने नटलेली मंदिरे पाहायला मिळतात.

पोहोचण्याच्या वाटा 

पुण्याहून स्वारगेट एस. टी. स्थानकातून कराड- साताराला जाणार्‍या एस. टी. ने शिरवळला पोहचता येते. बसने शिरवळ बस स्थानकात उतरून पुण्याच्या दिशेने १ किलोमीटर चालत गेल्यास डाव्या बाजूला केदारेश्वर मंदिर आणि उजव्या बाजूला शिरवळचा राजा मंदिर पाहून ब्राह्मण गल्लीतून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. वाट गावाच्या मध्य भागातून आणि बाजारपेठेतून जाते. किल्ल्याच्या समोरच प्रगती मुलींची शाळा आहे.

Source:-www.forttrekkers.com/subhan-mangal-fort-pune.html
Image Source:- Vicharmanthan Shirwal-Pride fb page

Credit:-  Forttrekkers writer

शिरवळ जवळील पांडवदरा ही १५ बौद्ध लेणींपैकी एक आहे असे समजले जाते. शिरवळ येथून जवळच दक्षिणेस सुमारे दोन तीन किलो मीटर अंतरावर पांडव दरा लेणी आहे. या लेणी काळा पाषाण खोदून अनेक छोट्या गुहा तयार केल्या आहेत. या सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगेत वसलेल्या आहेत.

पूर्वीच्या काळी पांडव अज्ञातवासात असताना त्यांनी या लेण्यांची निर्मिती करून त्यांनी या ठिकाणी मुक्काम केला होता अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यावरून या लेण्यांना पांडव लेणी असे म्हटले जाते.

फोटो संग्रह​

jakat pavai

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळ हद्दीतील नायगाव फाट्याजवळ पाषाणात कोरलेली पाणपोई आहे. ही पाणपोई सुमारे हजार ते बाराशे वर्षांपूर्वी ‘जकात पिव्हई’ म्हणजे जकात नाक्यावर केलेली असावी. पूर्वीच्या काळी वाटसरूंची तहान भागविण्यासाठी ही पाणपोई उभारण्यात आलेली असावी. अखंड पाषाणात कोरलेले दोन खांब, त्यामागे घडवलेले मोठे पाषाण एकमेकांवर रचून खोली तयार केली आहे. छतही एकमेकांवर दगडी रचून तयार करण्यात आले आहे. आतमध्ये जमिनीशी समतल दोन रांजण असून ते दगडी आहेत. हे सारे बांधकाम ‘शुषकसांधा’ पद्धतीचे म्हणजे कोणतेही चुना वा सिमेंट सारखे पदार्थ न वापरता करण्यात आले आहे.

धर्मशाळा बांधणे, पाणपोया उभारणे या संकल्पना कालबाह्य होत चालल्या आहे; पण मानवतावादी, सांस्कृतिक वारशाची साक्ष देणाऱ्या वास्तू आपन आजहि बघतो.

विशेष आभार- संदीप शेंडे